|
यांच्या द्वारा - श्रीपाद कोठे, नागपूर
|
 मी उगाच भटकत होतो वाळूच्या शांत समुद्री मौनाला बिलगून गेली मौनाची नाजुक गाणी
अवकाश मोकळे झाले अंतरात गुदमरलेले दु:खाच्या पाऊलखुणांनी गालावर ओघळलेले
नभी चंद्र जरासा तुटका वा-याने हालत नाही शपथांच्या स्मरणधुळीने आभाळ कोंदुनी जाई
हे असेच काहीबाही फुलणा-या झाडाजैसे गळणा-या पानांनाही का टोचत असतील काटे?
गाण्याचे दु:ख सुकोमल दु:खाचे गाणे भोळे दूरस्थ चांदणीचेही का भरून येती डोळे?
मातीचा स्पर्शच हळवा वाळूत कसा गवसावा भाळावर गोंदवलेला आलेख कसा मिटवावा?
- श्रीपाद कोठे, नागपूर रविवार, २५ डिसेंबर २०११
|